मुख्य सामग्रीवर वगळा

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल


नमस्कार लेखकहो,
आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा.
मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत.
माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

१) विचारांना मूर्त स्वरूप येते -


दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा.
यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे.

२) प्रश्नांची उकल होते -


अनेकदा आपल्या आयुष्यातले प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात.काही केल्या मार्ग सापडत नाही आणि आयुष्य struck होत.अशा वेळी कागदावर प्रश्न लिहायचा आणि मग याच काय कारण असेल ते लिहायचं.अस करत तोपर्यंत reverse जायचं जेव्हा पुढे प्रश्न न पडता उत्तर मिळतं. उत्तर मिळतं हे नक्की.

३) भावनांना वाट मोकळी होते-


अनेकदा आपण भावना मोकळेपणे बोलू शकत नाही.मैत्रीण,मित्र, मुलं,नवरा कोणाशीच १००% share नाही करता येतं.लेखन यासाठी उत्तम साथीदार आहे.लिहिल्याने मन विचारमुक्त होत, हलकं होत,आनंद मिळतो. हे लेखन फक्त स्वतःसाठी असावं की कोणाशी share करावं हा वैयक्तीक प्रश्न आहे पण लिहावं जरूर.

४) इतरांपर्यंत विचार पोचतात-


आपले विचार आपण बोलून दाखवतो.पण एक विचार आपण फार फार तर १० व्यक्तींना सांगू शकतो.जास्त व्यक्तींपर्यंत पोचायचं तर मग ते भाषण होईल. आजकालच्या online जगात भाषण ऐकायला कोणाला वेळ नसतो. हेच जर आपण लिहून विचार मांडले तर वाचक ते आपल्या सवडीने वाचतात.यातून समविचारी वाचकांपर्यंत आपण पोचतो.लेखकांचे विचार लेखनाद्वारे पोचण्याचा reach वाढतो.

५) Call to action-


आपण जेव्हा लिहीतो तेव्हा ४ क्रिया एकत्र होतात- 
लेखन, वाचन, श्रवण, आकलन. लिहिताना आपण नकळत वाचत असतो, तेच ऐकत असतो आणि तेच आपला मेंदू पुन्हा आकलन (grasp) करतो. यामुळे आपले विचार आणि वागणं आपणच पडताळून पाहतो. विचार डोक्यात पक्के बसतात आणि त्यावर कृती घेतली जाते, ज्याला आपण call to action म्हणतो.

मग आता पटलं ना की आपण सगळेच लेखक असतो. फक्त कालपरत्वे आपलं लिखाण बंद झालं आहे. लेखनाचे हे ५ सकारात्मक फायदे आपल्याला नक्कीच आपल्या ध्येयाकडे घेवून जातात. मग कधी घेतात call to action? आज लिहिताय ना?
मी अक्षदा विचारे,तुमची Happiness coach तुमच्या मदतीला आहेच.
लिहीते व्हा आणि आनंदी रहा.
mail id: akshada.vichare@yahoo.com
fb : Akkshada Vichare


टिप्पण्या

  1. खूपच सुंदर विचार मांडले आहेत.विशेष म्हणजे सद्य परिस्थितीत आपल्या स्वतः मध्ये असलेले सुप्त गुण उत्तमप्रकारे विकसित होण्या साठी हा सुचवलेला मार्ग खरेच आपणही छान लिहू शकतो आणि आपलेआपणच स्वतःचे प्रश्न सोडवू शकतो ही जाणीव करून देणारा हा वरील लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर प्रमाणे तुम्ही एक्सप्रेस करता तुमचे विचार मलाही ब्लॉग लिहायचा आहे पण अजून माहिती नाहीये कसं ते प्रयत्न चालू आहेत

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लिहिलंय तुम्ही, असेच लिहून पोस्ट करत जा

    उत्तर द्याहटवा
  4. ख़ुप छान ब्लॉग. आजच्या डिजिटल जगात आपण परावलंबी झालो आहोत.......फक्त वाचतो पण व्यक्त होत नाही......त्यासाठी लिहणे हा मार्ग आहे. Do share nice blogs.......Best wishes🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले

आनंदाचे ११ मूलमंत्र

मला सांगा तुम्ही शेवटचं मनापासून खळखळून कधी हसला आहात,आठवतंय का? आजकालच्या या टेन्शनच्या,धकाधकीच्या आयुष्यात आपल हसणं,आनंद अनुभवणं खूप दुर्मिळ झालंय.खर तर आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिली आहे.फक्त तो मिळवण्याचा मार्ग आपल्यावर सोपवला आहे.जगण्याच्या धडपडीत आपण हा आंनदाच गाव गमावून बसलोय.काय म्हणताय आनंदाचा गाव कुठे आहे ? कस जायचं या गावी?त्याच मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटात..चला तर मग.... पण तत्पूर्वी मला सांगा की, स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का? आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का? तुम्हाला एकट,एकाकी वाटत का? मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का? आपल्याला आनंद शोधायला का लागतो? बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय. याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत... १) सूर्यप्रकाशात चाला- सकाळच्या वेळी एक small break ...