
आज सकाळी caligraphy master अच्युत पालव यांनी स्वलीखित एक संदेश पाठवला.
प्रश्न माझा होता
तरीही उत्तर सापडत नव्हतं
उत्तर सापडलं तेंव्हा
प्रश्नच उरला नव्हता
आणि माझी विचार शृंखला सुरू झाली.आपल्याला रोज काही ना काही प्रश्न पडत असतात, कधी कधी भेडसावत असतात. आता हे प्रश्न पालव सरांनी म्हटल्याप्रमाणे माझे म्हणजे आपले स्वतःचे असतात.कधी ते मोठ्या स्वरूपाचे असतात जसे की नोकरी बदलावी का? तर कधी रोजच्या आयुष्यातले म्हणजे आज भाजी कोणती
करावी ?
काही प्रश्न लगेच सुटतात. जसे भाजी कोणती करावी? तर भाजी वांगी किंवा बटाटा करावी हा प्रश्न पटकन सुटला. नोकरी बदलावी का? हा प्रश्न सुटायला कदाचित ३-४ महीने लागतील. पण काही प्रश्न मात्र सुटता सुटत नाहीत.जसे कदाचित आरोग्यविषयक प्रश्न सुटायला नक्कीच जास्त वेळ लागतो. काही प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाची तीव्रता कदाचित कमी झालेली असते किंवा त्या प्रश्नाचं कारणच निघून गेलेलं असतं.
काही प्रश्न लगेच सुटतात. जसे भाजी कोणती करावी? तर भाजी वांगी किंवा बटाटा करावी हा प्रश्न पटकन सुटला. नोकरी बदलावी का? हा प्रश्न सुटायला कदाचित ३-४ महीने लागतील. पण काही प्रश्न मात्र सुटता सुटत नाहीत.जसे कदाचित आरोग्यविषयक प्रश्न सुटायला नक्कीच जास्त वेळ लागतो. काही प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाची तीव्रता कदाचित कमी झालेली असते किंवा त्या प्रश्नाचं कारणच निघून गेलेलं असतं.
उत्तर सापडलं तेंव्हा
प्रश्नच उरला नव्हता.
आता हे प्रश्न का पडतात तर मानवी मन विचार करत म्हणून, मानवी मन दुसऱ्याशी तुलना करत म्हणून, मानवाला मन आहे म्हणून. प्रश्न पडणं हे अर्थातच चांगल कारण जर न्यूटनला 'झाडावरून सफरचंद का पडलं' हा प्रश्न पडला नसता तर गुरुत्वार्षणाचा शोधच लागला नसता. प्रश्न पडल्यावर त्यावर आपण कसा विचार करतो यावर तो प्रश्न किती सकस आहे हे समजत.समजा एखादी गोष्ट घडली जस की काही कामात failure आलचं तर आपल्याला प्रश्न पडतो 'का बरं अपयश आलं?'
आता जर पुढचा प्रश्न असेल,"माझ्याच बाबतीत का असं होत? माझ्याच नशीबी अस का ?" तर मग प्रश्नाची दिशा चुकली.कारण ही मालिका काहीच साध्य करत नाही.उलट परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहते.
पण जर "अपयश कोणत्या कारणाने आलं? यात मी कशी सुधारणा करू?" असे प्रश्न नक्कीच सकारात्मक वाटचाल करतात आणि पुढचं पाऊल जास्त आत्मविश्वासाने पडतं.
प्रश्न लहान असो की मोठा प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतच-ते कधी आपल्याला सापडतं,कधी सापडतं नाही.ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाहीत ते प्रश्न मात्र सोडून द्यावेत. अशा वेळी आहे ती परिस्थिती स्वीकारावी आणि शांतपणे हे गीत ऐकावं,
'या प्रश्नाला उत्तर नव्हते....'
प्रश्नच उरला नव्हता.
आता हे प्रश्न का पडतात तर मानवी मन विचार करत म्हणून, मानवी मन दुसऱ्याशी तुलना करत म्हणून, मानवाला मन आहे म्हणून. प्रश्न पडणं हे अर्थातच चांगल कारण जर न्यूटनला 'झाडावरून सफरचंद का पडलं' हा प्रश्न पडला नसता तर गुरुत्वार्षणाचा शोधच लागला नसता. प्रश्न पडल्यावर त्यावर आपण कसा विचार करतो यावर तो प्रश्न किती सकस आहे हे समजत.समजा एखादी गोष्ट घडली जस की काही कामात failure आलचं तर आपल्याला प्रश्न पडतो 'का बरं अपयश आलं?'
आता जर पुढचा प्रश्न असेल,"माझ्याच बाबतीत का असं होत? माझ्याच नशीबी अस का ?" तर मग प्रश्नाची दिशा चुकली.कारण ही मालिका काहीच साध्य करत नाही.उलट परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहते.
पण जर "अपयश कोणत्या कारणाने आलं? यात मी कशी सुधारणा करू?" असे प्रश्न नक्कीच सकारात्मक वाटचाल करतात आणि पुढचं पाऊल जास्त आत्मविश्वासाने पडतं.
प्रश्न लहान असो की मोठा प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतच-ते कधी आपल्याला सापडतं,कधी सापडतं नाही.ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाहीत ते प्रश्न मात्र सोडून द्यावेत. अशा वेळी आहे ती परिस्थिती स्वीकारावी आणि शांतपणे हे गीत ऐकावं,
'या प्रश्नाला उत्तर नव्हते....'
अक्षदा
akshada.vichare@Yahoo.com
fb page: Akkshada Vichare
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा