मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या प्रश्नाला उत्तर नव्हते....

आज सकाळी caligraphy master अच्युत पालव यांनी स्वलीखित एक संदेश पाठवला. प्रश्न माझा होता तरीही उत्तर सापडत नव्हतं उत्तर सापडलं तेंव्हा प्रश्नच उरला नव्हता आणि माझी विचार शृंखला सुरू झाली.आपल्याला रोज काही ना काही प्रश्न पडत असतात, कधी कधी भेडसावत असतात. आता हे प्रश्न पालव सरांनी म्हटल्याप्रमाणे माझे म्हणजे आपले स्वतःचे असतात.कधी ते मोठ्या स्वरूपाचे असतात जसे की नोकरी बदलावी का? तर कधी रोजच्या आयुष्यातले म्हणजे आज भाजी कोणती करावी ? काही प्रश्न लगेच सुटतात. जसे भाजी कोणती करावी? तर भाजी वांगी किंवा बटाटा करावी हा प्रश्न पटकन सुटला. नोकरी बदलावी का? हा प्रश्न सुटायला कदाचित ३-४ महीने लागतील. पण काही प्रश्न मात्र सुटता सुटत नाहीत.जसे कदाचित आरोग्यविषयक प्रश्न सुटायला नक्कीच जास्त वेळ लागतो. काही प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाची तीव्रता कदाचित कमी झालेली असते किंवा त्या प्रश्नाचं कारणच निघून गेलेलं असतं. उत्तर सापडलं तेंव्हा प्रश्नच उरला नव्हता. आता हे प्रश्न का पडतात तर मानवी मन विचार करत म्हणून, मानवी मन दुसऱ्याशी तुलना करत म्हणून, मानवाला मन आहे म्हणून. प्रश्न पडणं हे अर्थातच च...

Vaccination सोहळा

गेले अनेक दिवस vaccination या विषयावर अनेक लेख, jokes, उलटसुलट चर्चा वाचल्यामुळे नकळत vaccination याविषयी भितीयुक्त कुतूहल मनात निर्माण झालं होत आणि अखेर आजचा दिवस उजाडला. आरोग्य सेतू वर आधीच registration केलं होतं.बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये सकाळी अत्यंत शिस्तबध्द रांग लावण्यात आली होती.रांग पाहून वाटलं, आता किती तास रांगेत उभं राहायला लागतयं कोण जाणे... सकाळी ९ वाजताच कामाला सुरवात झाली. रांग अगदी पटापट पुढे सरकत होती.आम्ही मुख्य हॉल मधे पोचलो तिथे बसायची सोय होती. सुमारे १० मिनिटातच आमचा नंबर आला आणि आम्ही कॉम्प्युटर entry ला पोचलो. Registrarion केलेला फोन नंबर सांगितला की आपलं registration दिसतं.मग आपला webcam ने फोटो आणि आधार scan होतं.आता मुख्य vaccination ! याविषयी तर काय न काय वाचलं होतं.पण प्रशिक्षित नर्सने vaccination इतकं हळूवारपणे दिलं की काही समजलच नाही.सोबत सगळ्या सूचना अगदी प्रेमाने सांगितल्या जात होत्या. शेेेेकायचं की नाही, paracetamol, crocin कधी घ्यायची इतक्या बारीक सारीक सूचना. Vaccination झालं की आपल्याला १५ मिनिट एका हॉलमध्ये बसवलं जातं आणि मग आपण घरी! ही सगळी ...

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल नमस्कार लेखकहो, आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा. मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत. माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. १) विचारांना मूर्त स्वरूप येते - दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा. यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे. २) प्रश्नांच...